पोस्ट्स

मराठवाडा मुक्ती दिन

  मराठवाडा मुक्ती दिन , ज्याला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असेही म्हणतात , महाराष्ट्रात दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो . हे मराठवाड्याच्या भारताशी एकात्मतेचे वर्धापन दिन आहे जेव्हा भारतीय सैन्याने, हैदराबाद राज्य मुक्त केले आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाचा पराभव केला.  15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले . फाळणीनंतर संस्थानांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा पर्याय देण्यात आला . हैदराबादचा शासक उस्मान अली खान याने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या मराठवाडा , तेलंगणा आणि कल्याण-कर्नाटक या प्रदेशांचा समावेश असलेल्या आपल्या संस्थानांना राज्याचा दर्जा द्यावा, असे आवाहनही त्यांनी संयुक्त राष्ट्रांना केले . त्यामुळे राज्यात बंडखोरी झाली . बंडाच्या काळात मराठवाड्यात रझाकारांविरुद्ध मोठा उठाव झाला. [ उद्धरण आवश्यक ] बंडाचे प्रमुख नेते स्वामी रामानंद तीर्थ , गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा आणि रमणभाई पारीख आणि पीएच पटवर्धन हे होते. बहिर्जी शिंदे निजामाविरुद्धच्या लढाईत आजेगाव येथे शहीद झाले...

खेड्याकडे चला, भविष्य घडवा!

  भारत हा कृषीप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर म्हणजे शेतीवर अवलंबून आहे. भारताची ८० टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहणारी असून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवरच अवलंबून आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या या लोकसंख्येला सक्षम बनवतानाच स्वत:चं चांगलं करिअर घडवण्याचा पर्याय ग्रामीण व्यवस्थापन या क्षेत्रात आहे. भारत हा कृषीप्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर म्हणजे शेतीवर अवलंबून आहे. भारताची ८० टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहणारी असून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवरच अवलंबून आहे. शेतीवर अवलंबून असणाऱ्या या लोकसंख्येला सक्षम बनवतानाच स्वत:चं चांगलं करिअर घडवण्याचा पर्याय ग्रामीण व्यवस्थापन या क्षेत्रात आहे. तांत्रिक आणि आर्थिक विकास, तसंच जागतिकीकरणामुळे प्रशिक्षित ग्रामीण व्यवस्थापकांना (रुरल मॅनेजर) असणारी मागणी येत्या काळात आणखी वाढणार आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागतील लोकांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वयंरोजगार किंवा रोजगाराचे तत्सम पर्याय निर्माण करण्याचं काम ग्रामीण व्यवस्थापक करतात. रुरल मॅनेजर (ग्रामीण...

गुलामी नष्ट करण्याचे प्रतीक म्हणजे भिमाकाेरेगाव

 पेशवाई म्हणजे एकाच जातीचे वर्चस्व,पेशवाई म्हणजे गुलामगिरीचे माहेरघर या माहेरघरात पेशव्यांनी सत्तेच्या बळावर माणसांना गुलामगिरीत डांबून ठाकले. महार - मांगाच्या गळ्यात पेशव्यांनी मडकी बांधली, कमरेला बांधलेल्या झाडूने रस्ता झाडत त्यांना नगर प्रवेश करावा लागे. सकाळी नि सायंकाळी जेव्हा सावल्या लांबवर पडतात तेव्हा दलितांना प्रवेशबंदी घातली गेली यांचे कारण राॅबर्टसन यांनी त्यांच्या " महार फाेक ए स्टडी ऑफ अनटचेबल्स इन महाराष्ट्र"या ग्रंथात दिले ते असे की" पेशव्यांच्या घराण्यातील एका स्त्रीचे व गणपती तुकाराम नावाच्या एका महार तरूण शिपायासाेबत प्रेम आणि शरीरसंबंध होते असा संशय पेशव्यांना आला म्हणून त्या तरूणाचा गुलटेकडीवर शिरच्छेद करण्यात आला तेव्हा महारांना जरबेत ठेवण्यासाठी पेशव्यांनी अशा क्रुर नितीचा उपयोग केला.   १४ वर्षाच्या मुक्ता साळवे यांनी महार-मांगाच्या दु:खा विषयी निबंध लिहला आहे. त्यामध्ये पेशव्यांनी अस्पृश्याप्रती केलेल्या क्रुर कृत्यांच्या आठवणी त्यांनी दिलेल्या आहेत. अस्पृश्यांना हत्तीच्या पायी देणे,त्यांच्या शिराचा चेंडू करून गुलटेकडीच्या मैदानात खेळणे या अमानवी क...

औरंगाबाद मधील वाढते प्रदूषन

शहरातील वायू प्रदूषण अध्याप धोकादायक पातळीवर असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालाचे औरंगाबाद शहरात राज्यातून तिसरा क्रमांकावर असल्याचे समोर आल्यानंतर उपाय-योजना हाती घेतल्या आहेत मात्र त्याचा परिणाम झालेला नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सरस्वती भुवन येथे हवा गुणवत्ता तपासणी केंद्रात हवेतील धूलिकण मर्यादी पेक्षा दुप्पट आढ ळले आहेत. असे पर्यावरण तज्ञ गीतांजली कौशल यांनी सांगितले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी जन जागृतीचे काम सुरू आहे. तसेच हवेतील धूलिकणांचे प्रमाण मोजण्यासाठी'पी एम २.५' केंद्र चार ठिकाणी उभारण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी नमूद केले आहे, गेल्या वर्षभरात औरंगाबाद शहराची हवा सुधारली आहे मात्र, शहरातील भूजल प्रदूषित झाले आहे एन सायलेन्स झोनमध्ये ध्वनी प्रदूषण झाल्याचे समोर आले आहे. घनकचरा व्यवस्थापनाची समस्या ही कायम असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२१-२०२२ वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे या अहवालाच्या २०१९-२०२० चहावाला सी तुलनेत करूना पूर्ण व करूना नंतरच्या शहराच्या प र्यावरणाच्या स्थितिने चित्र स्पष्ट केले धूलि...

शेतकऱ्यांची व्यथा

 भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो पण ह्या कृषी प्रधान नाव त्यांच्या मुळे आहे तोच फ्क्राशी चा वाटा शोधत आहे, खेड्या गावात जाद करून लोक शेती व्यवसाय करत असतात, म्हणजे खेड्या गावातून आपल्याला भूक भागवण्यासाठी ज्या धान्याची गरज आहे ते धान्य आपल्याला शेतकरी पुरवठा करत असतो, वस्त्र त्या पासुन तयार होत त्याचा कच्चा माल खेड्या मधून जात असतं, निवारा तुम्ही कितीही मोठे इंजिनिअर झाले तरी ते घर बनवणारा खेड्यामधीलचं असतो, आपल्या तीन मूलभूत गरजा पैकी तिन्ही गरजा खेड गाव देशाला पुरवत आहे. तरीदेखील खेड्यात नाही कुठली सोय खेड्यातील लोकांचे देशासाठी खरे योगदान आहे तरीही त्यांना जा ये करण्यासाठी साधा रस्ता उपलब्ध नाही, पाण्याची टंचाई आहेच, दवाखान्यात १० किलोमीटर अंतरावर जावे लागते पावसा ळ्यात तर पायी जावे लागते त्या व्यक्तिला जर पायी जाण्यास ऊशीर झाला तर त्या व्यक्तीस जिव देखील गमावा लागतो, खेड्यात नाही शिक्षणाची सोय ना शाळेत जाण्याची व्यवस्थाशहरातील मुले हुशार असता म्हणी पण ते इंजिनिअर, बिझनेसमन, होतात पण आमच्या खेड्यातील मुलगा मेजर, पोलीस या सारख्या नोर्कया करतो म्हणजे देशाची सुरक्षा त्याच...

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाद ला दिलेली भेट व वेरुळ गढ़ी

खड़की, फतेहनगर, औरंगाबाद, आणि छ. संभाजीनगर... हे सर्व एकाच शहराचे नावे आहेत, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराला अनेक ऐतिहासिक वास्तु नी वेढलेले आहे. याच ठिकाणी ज्ञानोबांनी रेड्या मुखी वेद बोलवले, याच ठिकाणी नाथांनी आपल्या भारुडा मधून समाजप्रबोधनाची धुरा सांभाळली. १२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग ही इथेच. भक्ति आणि शक्तिया संगम म्हणजे हे शहर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे शहर... स्वराज्यात पुरंदरचा अवघड तह झाला आणि त्या तहानंतर छत्रपती शिवाजी महा राजांना बादशाह औरंगजेबाने आर्याला बोलवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्या विनंतीवरून १६६५ रोजी छ्छ्त्रपती शिवाजी महाराज आर्याला जाण्यास निघाले. महाराजांचा मार्ग राजगडावरून नगर-शेवगाव- पैठण आणि औरंगाबाद असा होता. संभाजी महाराज हेही सोबत होतेच. औरंगाबाद जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मुक्काम पडला तो पैठणला, पैठणला मुकाम झाल्यानं तर महाराज बिडकीन बाभूळगाव या मार्गे औरंगाबादेत दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराज औरंग ाबादेत दाखल झाले तेव्हाचे वर्णन भीमसेन सक्सेना या समकालीन इतिहासकारा...

औरंगाबाद शहराच्या राजकीय इतिहासाच्या पाऊलखुणा

 प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला आणि महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली. भावी नगरसेवक म्हणून मिरवणारे तर गुडघ्याला बाशिंग बांधून उतावीळ नवरदेवासारखे बोहल्यावर चढायला तयारच आहेत. मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहराचा राजीकय इतिहास फार भूषणावह नाही, या शहराणे अनेक दंगली बघितल्या दंगलीत होणारी होरपळ या शहराने अनुभवली आहे. निवडणूक आणि दंगल जणू हे काय समीकरणच बनले की काय? हा प्रश्न सामान्य औरंगाबादकरां नाफ व्यथीत करणारा आहे. आजची तरुणाई राजकारणाकडे आकर्षित होत असताना शहराच्या राजका रणाचा इतिहास आणि आजचे वास्तव याविषयी घेतलेला हा आढावा. स्वातंत्र्यानंतर देशभरात काँग्रेसी विचारांचं वादळ होत, देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेस आणि काँग्रेस चा कार्यकर्ता पोहचलेला होता, औ- रंगाबाद शहरावर देखील काँग्रेसीचा प्रभाव होता इथल्या स्थानिक राजकारणावर काँग्रेसी नेत्यांची मज बूत पकड होती. स्थानिक निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस आणि काँग्रेस च बघायला मिळत असे.८० च्या दशकापर्यंत काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही अशा प्रकारची परिस्थिती होती. औरंगाबाद महापालिका आणि लोकसभेवर देखील कॉंग्रेसचे एकहाती...